२९ एप्रिल OBC चे वादळ पालघर जिल्हाधिकार्यालयावर धडकणार


चलो पालघर , चलो पालघर, चलो पालघर
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2022-04-08
   

बोईसर (संतोष घरत) : पालघर जिल्ह्यामध्ये ओबीसीचे आरक्षण शून्य टक्के झाल्याने ओबीसी आक्रमक झाले आहेत  ओबीसी मधील समाविष्ठ जाती कुणबी, वंजारी, भंडारी, आगरी,वाडवळ, मांगेला,बारी,खाटीक, साळी, कोष्टी, तेली, भावसार, वाणी, शिंपी, नाभिक, परीट, गुरव, गवळी, जंगम, पांचाळ, फुलारी, रंगारी, सुतार, कासार, धनगर, तांडेल, तांबट, मोमीन, घडशी, विणकर,कुंभार, सोनार, कोळी, लोहार, शिंपी, माळी, अशा अनेक जाती ओबीसी या प्रवर्गामध्ये मोडतात. आमचा डेटा कुठे आहे.  सवलती आरक्षणाचा आमचा वाटा कुठे आहे, ह्याचा जाब विचारण्या करिता  २९ एप्रिल २०२२ रोजी ३:०० वाजता जिल्हाधिकारी यांना जाब विचारणे करिता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे .                ह्या मोर्चा करिता शालेय विद्यार्थ्यांच्या सह महाविद्यालयीन विद्यार्थी व ओबीसी घटकातील प्रत्येक नागरिकांनी सामील होऊन मोर्चा यशस्वी करावा ह्या करिता आव्हान करण्यात आले आहे, हा मोर्चा जीवन विकास हायस्कूल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे. ओबीसी आरक्षण रद्द केल्याने जवळजवळ ९००० च्या वर शासकीय पदे रिक्त झालेले आहेत तर जिल्ह्यामध्ये ०% टक्के ओबीसी दाखवल्याने ओबीसी जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्याच १८ गड विविध जाती व धर्मांच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांचे आरक्षण बाबत मोठे योगदान आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत ३४० वा कलम केवळ ओबीसीसाठी घेतला आहे तर ओबीसी मध्ये ३६० जाती समाविष्ट केल्या आहेत. परंतु ओबीसी ची प्रचंड लोकसंख्या  असताना मात्र सत्तेतील आरक्षण सवलती पासून त्यां वंचित ठेवले आहे.. अनेक वर्ष ओबीसीची जनगणना होत नाही झालीस तर प्रस्तावित व्यवस्थेचे धाबे दणाणतील म्हणून जातीनिहाय जनगणना होत नाही. म्हणून ओबीसी ची आरक्षण व जणगणने बाबत ही लढाई लढण्याकरिता सर्व राजकीय पक्षाचे राजकीय हेवेदावे,जोडे बाजूला ठेवून ओबीसी म्हणून प्रत्येक पिढीत येणाऱ्या ओबीसीचे अस्तित्वाचा प्रश्न सरकार दरबारी मांडण्याकरिता २९ एप्रिल च्या लढाई करिता सज्ज झाल्याचे दिसत आहे. 
ब्रिटिशांच्या राजवटीत १८३१ मध्ये ब्रिटिशांनी जनगणना केली होती त्यावेळी ओबीसी ५२%  लोकसंख्या होती ,मात्र देशाची फाळणी झाल्यानंतर आजच्या घडीला ओबीसी लोकसंख्या ६०% पर्यंत गेली असताना सुद्धा सरकार ओबीसीला आरक्षण बाबत चालढकल करत आहे  म्हणून ओबीसी समाजाने नियोजनबद्ध कमिटी तयार करून  मोर्च्याचे आयोजन करून जिल्हाधिकार्यालयावर आपला आक्रोश दाखवणार आहेत . ह्या करिता वंजारी समाज हॉल मध्ये सर्व राजकीय पक्षातील नेते मंडळींची सभा होऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

    Post Views:  297


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व