मुंबईकरांसाठी मोठी बातमी; नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आले नवे निर्बंध, पाहा, संपूर्ण नियमावली!


 संजय देशमुख  17 Dec 2021, 10:08 PM
   

मुंबई : लवकरच नाताळ येत असून नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज होत आहेत. मात्र, मुंबईत ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असून काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याचा विचार करून मुंबई पोलिसांनी नवी नियमावली जारी केली आहे.
मुंबई: राज्यात ओमिक्रॉनचे (Omicron) नव्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने काहीसे चिंतेचे वातावरण आहे. तसेच येत्या फेब्रुवारी महिन्यात ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता राज्य सरकारने व्यक्त केली आहे. अशात काही दिवसांवर नाताळ येऊन ठेपला असून नव्या वर्षाच्या स्वागताचीही तयारी सुरू आहे. हे लक्षात घेत नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुंबईत नवे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे निर्बंध उद्यापासून म्हणजेच १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर अशा १६ दिवसांच्या कालावधीसाठी लागू असणार आहेत. 
मुंबईकरांसाठी मोठी बातमी; नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आले नवे निर्बंध, पाहा, संपूर्ण नियमावली!
काय आहेत नवे निर्बंध?


> निर्बंधांच्या या १६ दिवसांच्या कालावधीत कार्यक्रमांचे आयोजक आयोजक, सहभागी होणारे लोक, पाहुणे, ग्राहक या सर्वांचे पूर्णपणे लसीकरण झालेले असणे बंधनकार आहे.

> दरम्यानच्या काळात दुकाने, मॉल, आस्थापना, कार्यक्रमांची ठिकाणे, मेळाव्यांच्या ठिकाणी आलेल्या व्यक्तींनी लसींचे दोन्ही डोस घेतलेले असले पाहिजेत. अभ्यागत आणि ग्राहकांचेही पूर्ण लसीकरण झालेले असले पाहिजे.


> मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूकसेवेद्वारे जे लोक प्रवास करतील अशा सर्वांचे लसीकरण झालेले असले पाहिजे. लशीचे दोन्ही डोस न घेतलेल्या व्यक्तींना प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

> परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण झालेले असावे. किंवा त्यांनी ७२ तासांपूर्वी करण्यात आलेली आरटीपीसीआर चाचणी केलेली असली पाहिजे.


> कोणत्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी, स्पर्धा, मेळावे किंवा समारंभांच्या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच उपस्थित राहण्याची अनुमती असणार आहे. जर अशा कार्यक्रमांमध्ये एकूण उपस्थित लोकांची संख्या १ हजारांपेक्षा अधिक असेल, तर स्थानिक प्राधिकरणाला याबाबत माहिती देणे बंधनकारक असेल.

> बंदीस्त सभागृहांमध्ये, बंदिस्त रेस्टॉरंट्समध्ये तसेच हॉलमध्ये ५० टक्के इतक्या क्षमतेपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही.


> मोकळ्या जागी २५ टक्क्यांहून अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.

> ३१ डिसेंबर आणि नाताळानिमित्त आयोजित कार्यक्रम, पार्ट्यांवर प्रत्येक वॉर्डात महापालिकेची 4 पथके टेहळणी करण्यासाठी तैनात ठेवण्यात येणार आहेत..


> नियम मोडणाऱ्या कार्यक्रमांचे आणि पार्ट्यांच्या आयोजकांवर, तसेच रेस्टॉरंट्सचे मालक, हॉटेलचे मालक यांच्यावरही नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

    Post Views:  253


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व