सोलापूर : राज्यातील एक लाख 41 हजार व्यक्तींचा कोरोनाच्या (Covid-19) दोन्ही लाटेत मृत्यू झाला आहे. त्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 50 हजारांप्रमाणे सात हजार 50 कोटींची मदत मिळेल. यासंदर्भात आज (शुक्रवारी) राज्य सरकारने (Maharashtra State Government) नवीन आदेश काढले आहेत. पुढील आठवड्यापासून मृतांच्या नातेवाइकांना सेतू केंद्रात अथवा महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतीतून अर्ज करता येणार आहेत. कोरोना झाल्यानंतर 30 दिवसांत मृत्यू झालेल्यांना मदत दिली जाणार असून त्यासाठी मृत्यू प्रमाणपत्राचे बंधन घातले आहे.
Post Views: 317
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay