नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत. गेल्या तीन दिवसात दहशतवाद्यांनी तिसरा हल्ला केला आहे. कथुआ जिल्ह्यातील हिरानगर भागात दहशतवाद्यांनी एका घरावर बेछूट गोळीवार सुरू केला. यात दोन रहिवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. शिवाय यावेळी भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले होते. यात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
सईदा सखल गावातील एका रहिवाशाने गोळीबार ऐकला आणि त्याने लष्कराला याबाबत माहिती दिली. त्यानंतर लष्कराने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात दोन ते तीन दहशतवाजी लपून बसले आहेत. गोळीबार करून दहशतवादी जंगलात पळून गेले आहेत. सीमा सुरक्षा बल आणि जम्मू पोलिसांनी संयुक्त मोहीम सुरु केली असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
Post Views: 301
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay